-
“माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील”टेहळणी बुरूज—२००० | नोव्हेंबर १५
-
-
मग ती त्याला म्हणते, “ये चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू.” हे आमंत्रण फक्त जेवणाचे आमंत्रण नाही. ती त्याला शारीरिक सुख देण्याचे वचन देते. आणि या तरुणासाठी तर हा नाविन्यपूर्ण व खूष करणारा अनुभव होता! पण ती एवढ्यावरच थांबत नाही. पुढे ती त्याला म्हणते: “कारण घरधनी घरी नाही; तो दूरच्या प्रवासाला गेला आहे; त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे; तो पौर्णिमेस घरी येईल.” (नीतिसूत्रे ७:१८-२०) असे बोलून ती या तरुणाला सांगू इच्छिते, की माझा नवरा कामानिमित्ताने दूर गेला असल्यामुळे इतक्यात तो पुन्हा घरी येणे शक्य नाही तेव्हा आपल्याला कसलीही भीती नाही. किती सहजरीत्या तिने या तरुणाला फसवले आहे! “तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले.” (नीतिसूत्रे ७:२१) हा मोहक प्रसंग टाळण्यासाठी एखाद्याकडे योसेफासारखे मनोबल हवे! (उत्पत्ति ३९:९, १२) आहे का अशी हिम्मत या तरुणाकडे?
-
-
“माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील”टेहळणी बुरूज—२००० | नोव्हेंबर १५
-
-
राजाने पाहिलेल्या ‘परक्या स्त्रीने’ त्या तरुणाला “ये चल . . . आपण प्रीतीने रमून तृप्त होऊ” असे आमंत्रण दिले. अनेक युवकांना आणि खासकरून मुलींना अशाचप्रकारे भुलवले जात नाही का? समजा कोणी तुम्हाला अनैतिक कृत्य करायला भुलवत असेल तर थांबा आणि विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्याविषयी खरोखरच प्रेम आहे की ती फक्त तिची कामवासना आहे? एखादा पुरूष खरोखरच एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असेल तर तो तिला तिच्या ख्रिस्ती शिक्षणाच्या व विवेकाच्या विरुद्ध कार्य करायला भाग पाडेल का? याचकारणास्तव, शलमोन म्हणतो, की अशा ‘मार्गांकडे आपण आपले मन वळू देऊ नये.’
-