-
देवाच्या ज्ञानाच्या विरोधात असलेले तर्कवितर्क उलथून टाका!टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१९ | जून
-
-
१. अभिषिक्त ख्रिश्चनांना पौलने कोणता इशारा दिला होता?
“या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका.” (रोम. १२:२) हा इशारा प्रेषित पौलने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना दिला होता. यहोवाला समर्पित आणि पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झालेल्या ख्रिश्चनांना पौलने इतका कडक इशारा का दिला?—रोम. १:७.
२-३. सैतान कशा प्रकारे आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो? आणि आपण आपल्या मनात असलेल्या भक्कम बुरुजांसारख्या गोष्टी कशा प्रकारे पाडू शकतो?
२ सैतानाच्या जगातल्या हानीकारक विचारांचा काही ख्रिश्चनांवर प्रभाव झाला होता आणि यामुळे पौल चिंतित होता. (इफिस. ४:१७-१९) हीच गोष्ट आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत घडू शकते. सैतान या जगाचा शासक असल्यामुळे तो वेगवेगळ्या युक्त्यांचा उपयोग करून आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. त्यातली एक युक्ती म्हणजे स्वतःला महत्त्व देण्याची किंवा प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा. या इच्छेचा वापर करून तो आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तसंच, तो आपली पार्श्वभूमी, संस्कृती आणि आपलं शिक्षण यांमधल्या काही विशिष्ट पैलूंचा उपयोग करून आपल्याला त्याच्यासारखा विचार करायला लावतो.
-
-
देवाच्या ज्ञानाच्या विरोधात असलेले तर्कवितर्क उलथून टाका!टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१९ | जून
-
-
“आपली विचारसरणी” बदलणे
४. आपण सत्य स्वीकारलं तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोणते बदल करावे लागले?
४ तुम्ही जेव्हा सत्य स्वीकारलं आणि यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुम्हाला किती बदल करावे लागले होते याचा जरा विचार करा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना यहोवाची सेवा करण्यासाठी चुकीच्या गोष्टी सोडाव्या लागल्या होत्या. (१ करिंथ. ६:९-११) खरंच, आपण यहोवाचे किती आभारी आहोत की त्याच्या मदतीने आपण वाईट सवयींवर मात करू शकलो!
५. रोमकर १२:२ या वचनानुसार आपण कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत?
५ आता आणखी काही बदल करण्याची गरज नाही असा आपण विचार करू नये. आपण जरी बाप्तिस्मा घेण्याआधी गंभीर पाप करण्याचं सोडून दिलं असलं, तरी आतादेखील आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. पुन्हा त्या पापांकडे नेणारा कोणताही मोह टाळण्यासाठी आपल्याला सतत मेहनत घेण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो? पौल आपल्याला सांगतो: “या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोम. १२:२) यासाठी आपण दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे, या जगाचं “अनुकरण करू नका” म्हणजेच आपण त्याद्वारे प्रभावीत होऊ नये. दुसरी म्हणजे, आपल्याला आपली “विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर” करावे लागेल.
६. मत्तय १२:४३-४५ या वचनांनुसार आपल्याला येशूच्या शब्दांतून कोणता महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो?
६ पौल ज्या रूपांतराबद्दल बोलत होता ते फक्त आपण बाहेरून कसे दिसतो त्याबद्दल नव्हतं. तर तो अशा रूपांतराबद्दल बोलत होता ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व आतून आणि बाहेरून बदलतं. (“रूपांतर की रूप घेणं” ही चौकट पाहा) आपण पूर्णपणे म्हणजे आपली मनोवृत्ती, भावना आणि इच्छा यांत बदल केला पाहिजे. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की, ‘ख्रिस्ती बनण्यासाठी मी केलेले बदल फक्त वरवरचे आहेत की मनापासून आहेत?’ आपलं आतलं व्यक्तिमत्त्व बदलणं खूप महत्त्वाचं आहे. मत्तय १२:४३-४५ या वचनांनुसार आपल्याला काय करण्याची गरज आहे याबद्दल येशूने सांगितलं. (वाचा.) या वचनांतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे आपण मनातून चुकीचे विचार काढणंच पुरेसं नाही, तर त्याजागी देवाला मान्य असलेले विचार भरणंही गरजेचं आहे.
-