१३ बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांची शिस्त स्वीकारतो,+
पण घमेंडी माणूस ताडनाकडे लक्ष देत नाही.+
२ माणूस आपल्या तोंडून निघणाऱ्या शब्दांमुळे चांगल्या गोष्टींनी तृप्त होतो,+
पण विश्वासघातकी माणसाच्या जिवाला हिंसेची आवड असते.
३ जो सांभाळून बोलतो, तो आपला जीव वाचवतो,+
पण ज्याचा तोंडावर ताबा नसतो, तो नाश ओढवून घेईल.+
४ आळश्याला पुष्कळ गोष्टींची हाव असते, पण तरी त्याच्याजवळ काही नसतं,+
मेहनत करणारा मात्र पूर्णपणे तृप्त होईल.+
५ नीतिमान माणूस खोटेपणाचा तिरस्कार करतो,+
पण दुष्टाच्या कामांमुळे त्याला लज्जित आणि अपमानित व्हावं लागतं.
६ निर्दोष मार्गाने चालणाऱ्याचं नीतिमत्त्वामुळे संरक्षण होतं,+
पण दुष्टपणा पापी माणसाला खाली पाडतो.
७ एखादा माणूस श्रीमंत असल्याचा दिखावा करतो, पण त्याच्याजवळ काहीही नसतं,+
दुसरा गरीब असल्याचं दाखवतो, पण त्याच्याजवळ भरपूर संपत्ती
असते.
८ श्रीमंत माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपली संपत्ती देतो,+
पण गरिबाला कोणी साधी धमकीही देत नाही.+
९ नीतिमानाचा प्रकाश तेजस्वीपणे चमकतो,+
पण दुष्टाचा दिवा विझून जाईल.+
१० गर्विष्ठपणामुळे मतभेद होतात,+
पण जे सल्ला घेतात, ते बुद्धिमान असतात.+
११ झटपट मिळवलेली संपत्ती कमीकमी होत जाते,+
पण जो हळूहळू साठवतो, त्याची संपत्ती वाढत जाईल.
१२ अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं,+
पण पूर्ण झालेली इच्छा म्हणजे जीवनाचा वृक्ष!+
१३ जो शिकवण तुच्छ लेखतो, त्याला दंड भरावा लागेल,+
पण जो आज्ञेला मान देतो, त्याला प्रतिफळ मिळेल.+
१४ बुद्धिमानाची शिकवण म्हणजे जीवनाचा झरा,+
ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते.
१५ ज्याच्याकडे सखोल समज असते त्याच्यावर कृपा होते,
पण विश्वासघातकी माणसाची वाट खडतर असते.
१६ शहाणा माणूस सुज्ञपणे वागतो,+
पण मूर्ख आपला मूर्खपणा दाखवून देतो.+
१७ दुष्ट निरोप्या संकटात सापडतो,+
पण विश्वासू राजदूतामुळे फायदा होतो.+
१८ शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर गरिबी आणि कलंक येतो,
पण जो ताडन स्वीकारतो त्याचा गौरव होईल.+
१९ इच्छा पूर्ण झाल्यामुळे माणसाला आनंद होतो,+
पण वाईट गोष्टी सोडणं मूर्खांच्या जिवावर येतं.+
२० बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल,+
पण मूर्खांची संगत धरणाऱ्याचं नुकसान होईल.+
२१ संकट पापी लोकांची पाठ सोडत नाही,+
पण नीतिमानाला समृद्धी मिळते.+
२२ चांगला माणूस आपल्या नातवंडांसाठी वारसा ठेवून जातो,
पण पापी माणसाची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.+
२३ गरिबाच्या नांगरलेल्या शेतात भरपूर पीक येतं,
पण अन्यायामुळे ते हिरावून घेतलं जाऊ शकतं.
२४ जो काठी आवरतो, तो आपल्या मुलाचा द्वेष करतो,+
पण जो त्याच्यावर प्रेम करतो, तो त्याला शिक्षा करायला चुकत नाही.+
२५ नीतिमान खाऊन तृप्त होतो,+
पण दुष्टाचं पोट रिकामंच राहतं.+